
दुबई (वृत्तसेवा):- गोलंदाजांच्या अचूक मार्यानंतर सलामीवीर शिखर धवन (११४ धावा, १०० चेंडू, १४ चौकार, २ षटकार) आणि रोहित शर्मा (नाबाद १११ धावा, ११९ चेंडू, ७ चौकार, ४ षटकार) यांनी वैयक्तिक शतके झळकावित सलामीला केलेल्या २१० धावांच्या भागीदारीच्या जोरावर भारताने रविवारी आशिया चषक क्रिकेट सुपर ङ्गोर लढतीत परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ९ गडी व ६३ चेंडू राखून पराभव केला. भारताने या स्पर्धेत विजय मोहीम कायम राखत जवळजवळ अंतिम ङ्गेरीत प्रवेश निश्चित केला.
अधिक माहिती: Beed